Monday, October 27, 2008

घ्रिश्णेश्वर

औरंगाबादहून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे जोर्तिलींग फार पूरातन काळतले म्हणजे जवळपास पहिल्या दशकातले आहे. जवळच दौलताबानचा किल्ला व अजठा-वेरूळ असल्यामुळे येथे मोठ्याप्रमाणावर पर्यटक येतात. अहिल्याबाई होळकर यांनी येथे देऊळ बांधले. अ‍‍‍हिल्याबाई यांनी बनारस येथील काशी विश्वेश्वर व गया येथील विष्णु पंडा येथेही देऊळ बांधले. या जोतिर्लिगा बाबतीत असे सा‍गितले जाते की कुसूमा नावाची एक स्त्री ‍शंकराची मनोभावे पुजा करत असे. ‍ती शिवलींग एका टाकीत पाण्यात बुडवून काढत असत तीच्या नवरयाची पहिल्या बायकोला ते पाहवत नाही. ती कुसूमच्या मुलाला ठार करते. दु:खी झालेली कुसूम तरीपण शिवलीगांची पुजा करत असते. जेव्हा ती शिवलींग पाण्यात बुडवते व वर काढते तेव्हा तिचा मुलगा आर्श्चयकारक रित्या जिवंत होतो. त्यामुळे येथे शिवलींगाला घ्रिश्णेश्वर म्हणतात.

No comments: