Monday, December 1, 2008

धारची भोजशाळा


मध्य प्रदेशातील धारच्या ऐतिहासिक भोजशाळेत दरवर्षी वसंत पंचमीला सरस्वती देवीच्या उपासकांची जत्रा भरते। या ठिकाणी सरस्वती मातेची या दिवशी पूजा-अर्चा केली जाते. येथे यज्ञवेदीत पडणारी आहुती आणि अन्य अनुष्ठाने पूर्वीच्या वैभवाची आठवण करून देतात. या वर्षी 11 फेबुवारी 2008 ला वसंत पंचमी असून उत्साहित, आनंदी वातावरणात साजरी केली जाणार आहे. राजा भोज हे सरस्वती देवीचे उपासक होते. त्यांच्या काळी सरस्वती देवीच्या साधनेला विशेष महत्त्व होते. त्या काळात सामान्य लोकही संस्कृतचे विद्वान असायचे. त्यामुळे धार, संस्कृत आणि संस्कृती यांचे केंद्रबिंदू होते. राजा भोज, सरस्वतीच्या कृपेने योग, न्याय, ज्योतिष, धर्म, वास्तुशास्त्र, राज्य-व्यवहार शास्त्र यासारख्या बर्‍याच शास्त्रात पारंगत होता.

त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही नावाजले जातात। परमार वंशातील महान राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजा भोजचा धारमध्ये 1000 इ.स. पासून 1055 कार्यकाल होता. राजा भोज विद्वानांचे आश्रयदाता होते. त्यांनी धारमध्ये एक विद्यापीठाची स्थापना केली होती, तेच नंतर भोजशाळा या नावाने प्रसिद्ध झाले. त्या काळातील साहित्यात या नगराचा उल्लेख धार तसेच शासन यशोगानचा असा आहे.

भोजशाळा एका खुल्या मैदानात बांधली आहे। भोजशाळेच्या समोर एक मुख्य मंडळ आणि मागच्या बाजूला एक मोठे प्रार्थना घर आहे. नक्षीदार स्तंभ तसेच प्रार्थनागृहाचे नक्षीदार छत भोजशाळेच वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी दोन मोठे शिलालेख (काळ्या रंगाचे दगड) आहेत. या शिलालेखांवर संस्कृतात नाटक कोरलेले आहे. हे अर्जुन वर्माच्या काळात कोरलेले आहे.

या काव्यबध्द नाटकाची रचना राजगुरू मदन यांनी केली होती. ते विख्यात जैन विद्वान आशाधर यांचे शिष्य होते. या नाटकाचा नायक पूरंमंजरी आहे. हे नाटक धारच्या वसंतोत्सवात अभिनित करण्यासाठी लिहिले गेले आहे. भोजशाळेत स्तंभांवर धातूपासून बनविली जाणारी वर्णमाला अंकित आहे. भवन कलेच्या रूपात भोजशाळा एक महत्त्वाची कलाकृती गणली जाते.

No comments: