
Friday, November 28, 2008
दक्षिण काशी अर्थात श्रीकालहस्ती

श्री लक्ष्मी नरसिंह चंदनोत्सव

संत सिंगाजीचे समाधी स्थळ

धुनीवाले दादाजी

योगेंद्र शीलनाथ बाबा

खांडव्याचे भवानीमाता मंदिर

तमिळनाडूतील वैद्यनाथस्वामी मंदिर

श्री जगदंबा देवी

मुंबईचे महालक्ष्मी मंदिर

श्री नटराज मंदिर चिदंबरम

देवाधिदेव भगवान शंकराचे सर्वोच्च देवतेच्या रूपात पूजन करणा-या भक्तांसाठी तमिळनाडूतील चिदंबरम येथील नटराज मंदिर भक्तीच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे। आपल्यातील सर्व पवित्र शक्तींनी महादेव शंकराने या ठिकाणाला पावन केले असल्याची भक्तांचा समज आहे।पुराणांमध्ये असलेल्या उल्लेखानुसार प्रभू शिव येथे 'ॐ'कारच्या प्रणव मंत्र रूपात विराजमान आहेत. याचमुळे भक्तांसाठी या मंदिराचे स्थान महत्त्वाचे आहे. हे मंदिर भक्तांसाठी प्रचंड महत्त्वाचे आहे. भगवान शिवाच्या पाच भक्ती स्थळांपैकी चिदंबरम एक असून हे स्थान शंकराचे आकाश क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नटराज मंदिराला अग्नी मूल म्हणूनही ओळखले जाते. भोलेनाथ येथे ज्योती रूपात विराजमान असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे.
इतर चार क्षेत्रांमध्ये कालाहस्ती (आंध्रप्रदेश) किंवा वायू, कांचीपुरमचे पृथ्वी, तिरुवनिका- जल आणि अरुणाचलेश्वर (तिरुवनामलाई) म्हणजेच अग्नी यांचा समावेश आहे। हिंदू धर्मातील मान्यतेनुसार याच पंचतत्त्वांनी (पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश) मानवी शरीराची निर्मिती झाली आहे. नटराज मंदिराला अग्नी मूळ या नावानेही ओळखले जाते.मंदिराची रचना अत्यंत सुबक व आकर्षक असून वैशिष्ट्यपूर्ण आहे. चार सुंदर आणि मोठ्या घुमटांमुळे मंदिर भव्य वाटते. मंदिराची अंतर्गत रचना, सजावट, शिल्पकारी आणि मंदिराचे व्यापक क्षेत्रफळ यामुळे ते सहज डोळ्यात भरते.
शिवाच्या नटराज स्वरूपातील मूर्तीमुळे भरतनाट्यम कलावंतांचेही हे श्रध्दास्थान आहे। मंदिराच्या प्रत्येक खांबावर भरतनाट्यम नृत्याच्या वेगवेगळ्या शैली दाखविणा-या मूर्ती आहेत. मंदिराच्या गाभा-यात भगवान शिवकाम सुंदरी (पार्वती) सह स्थापित आहेत. मंदिराची देखरेख आणि पूजाविधी पारंपरिक पुजारींकडून केली जाते. मंदिराला भक्तांकडून दिल्या जाणा-या देणगीतूनच मंदिराचे कामकाज चालविले जाते.शिव क्षेत्रम म्हणूनही मंदिर ओळखले जाते. भगवान गोविंदाराज यांची मूर्तीही मंदिरात शिवशंकराजवळच स्थापन करण्यात आली आहे. मंदिर परिसरात अत्यंत सुंदर तलाव आणि नृत्य परिसर आहे. येथे दरवर्षी होणा-या नृत्य कार्यक्रमासाठी दूरवरून कलावंत सहभागी होत असतात.
कसे जाणार
रेल्वे मार्ग : चिदंबरम चेन्नई-तंजावर मार्गावर चेन्नईपासून 245 किमी अंतरावर मंदिर आहे. चिदंबरम नावानेच रेलवे स्टेशन ओळखले जाते. रस्त्याने : चेन्नईहून कुठल्याही वाहनाने 4-5 तासांत चिदंबरमला पोचता येते. विमान सेवा : चिदंबरम जाण्यासाठी सर्वाधिक जवळचे विमानतळ चेन्नई आहे. तेथून रस्त्याने किंवा रेल्वे मार्गे चिदंबरम जाता येईल.
जागृत देवस्थानः उलटे हनुमान

Thursday, November 20, 2008
अविस्मरणीय केदारनाथ
गोव्यातील हिरवीगार सृष्टी!
फ्युजन

त्यांच्या मानाने तसा मी नवखाच. गेली काही वर्ष जपानमधल्या घडामोडी तिकडच्या मराठी मंडळींपर्यंत पोहोचवण्याचे काम श्रीकांत अत्रे करत आलेले आहेत. त्यात, आपण थोडीशी भर घालावी या हेतूने करत असलेला हा पहिलाच प्रयोग.
टोकियोजवळ असलेल्या शिवमाता शहरामधल्या "ताईसाकुतेन' या प्रसिद्ध ओतेरा (देऊळ) मध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम झाला। त्याबद्दल सांगायच्या आधी, या ओतेराबद्दल थोडंसं. हे देऊळ तीनशे वर्ष जुनं आहे आणि त्यात असलेली ८५० वर्ष पुरातन मूर्ती देवाधिदेव इंद्राची आहे. हे ऐकून माझा विश्वासच बसला नाही. इतकेच नाही, तर इंद्राच्या व्यक्तिरेखेवर आधारित ऍनिमेशन सिरीजसुद्धा आहे. असो. त्याबद्दल लिहायचे तर एक वेगळाच लेख लिहावा लागेल.
भरतनाट्य्मसारखा अवघड न्यृत्यप्रकार त्यांनी आत्मसात केला आहे. गेली काही वर्ष त्या इथे भरतनाट्य्म शिकवत आहेत. त्यांच्याकडे १२० मुली भरतनाट्य्म शिकत आहेत.
भारतीय मुली तर आहेतच पण जपानी मुलींची संख्याही लक्षणीय आहे। या मुली नुसतंच शिकत नाहीत तर त्यांनी ही कला चांगलीच अवगत केली आहे. गेली काही वर्ष इथे होत असलेल्या "नमस्ते इंडिया' सारख्या कार्यक्रमातून त्या आपली कला सादर करत आल्या आहेत. कोणी जपानी, भारतीय कलेबद्दल एवढे काही करते आहे हे बघून आनंद वाटला.
भरतनाट्य्मनंतर सादर झाला तो बॉलिवडू-टॉलिवूड डान्स।
असं हे आगळंवेगळं फ्युजन... जपानी आणि भारतीय मुलींनी एकत्र येऊन केलेल्या भरतनाट्य्म आणि बॉलिवूड डान्सचं
निसर्गरम्य अरिझोना

Friday, November 14, 2008
अजंठा

अजंठा-वेरूळ लेणी म्हणूनच जगप्रसिद्ध झालेली आहेत. परंतु आश्चर्य असे की, जगविख्यात झालेल्या अजंठा येथील गुंफा गेल्या शतकात योगायोगानेच प्रकाशात आल्या. एरवी त्या शेकडो वर्षे अज्ञातवासातच होत्या आणि पुढेही त्या अंधारातच राहिल्या असत्या.
इ। स. १८१९ मध्ये एक ब्रिटीश क्रॅप्टन जॉन स्मिथ या परिसरातील गर्द जंगलात शिकार खेळण्यासाठी आला असताना जंगलाने व्यापलेल्या या गुंफा अचानक त्याच्या नजरेस आल्या आणि त्यानंतर मात्र तेथील रान मोकळं करून या गुंफाचा शोध घेण्यात आला.
ज्या डोंगरात ही लेणी खोदण्यात आली आहेत. त्यांच्या माथ्यावर एक जलौघ असून त्याचे पाणी एका नैसर्गिक कुंडात साठवले जाते.
या कुंडास सप्तकुंड असे म्हणतात. क्र. ९ व १० च्या लेण्यात चैत्यगृहे आहेत. ८, १२, १३ व १५ क्रमाकांच्या लेण्यांचाही मठ किंवा प्रवचने यासारख्या धार्मिक कर्मासाठी उपयोग होत असावा. लेणी क्र. १, २, १६, १७, १९ व २६ या सुद्धा अशाच कार्यासाठी तयार करण्यात आली असावीत. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध आणि बुद्ध जीवन शिल्प व चित्रकलेद्वारे चितारण्यात आले आहे. लेण्यांमध्ये चितारण्यात आलेली रंगीत चित्रे तर अतिशय अप्रतिम आहेत. शेकडो वर्षे उलटूनही त्यातील रंग मात्र अजूनही उबदार आहेत. बुद्धावतार, जातककथा असे बुद्धजीवनाशी निगडित प्रसंग येथे कलात्मकतेने चित्रित केलेले आहेत. बोधीसत्व पद्मपाणी, आकाशगामी अप्सरा, बुद्धाचे सहस्त्रावतार, नृत्यगायन करणाऱ्या अप्सरा, पत्नीकडे भिक्षेची याचना करणारा बुद्ध, राजसभा आदि चित्रे खरोखरीज अद्वितीय आहेत. गुंफांमध्ये चितारलेली रंगीत चित्रे आणि शिल्पचित्रे भव्य तर आहेतच पण त्यातील भाव, नाट्य, बांधेसूदपणा, लय आणि गति यामुळे सर्व कलाकृतींना कमालीचा जिवंतपणा आलेला आहे.
पन्हाळा

रायगड
मराठी दौलतीतील अत्यंत अवघड आणि म्हणूनच सुरक्षित असलेला हा किल्ला होय. संपर्काच्या दृष्टीने व कारभाराच्या दृष्टीने तो शिवरायांना इतर किल्ल्यांपेक्षा अधिक सोयीचा वाटला. रायगड येथे राजधानी असल्याने या किल्ल्यात सर्व सोयीसुविधा होत्या. एक नगरीच तेथे वसवण्यात आली होती. समुद्र सपाटीपासून जवळजवळ ८५५ मीटर उंच असलेल्या रायगडावर जाण्यासाठी पायऱ्या असून त्याशिवाय असलेले अन्य मार्ग अतिशय कठिण आणि अवघड आहेत.रायगड जिल्ह्यातील महाड या गावापासून उत्तरेला सुमारे २६ कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या माथ्यावर हा किल्ला उभा आहे. सभोवताली पर्वतराई, खोल दऱ्या आणि भुरळ घालणारी निसर्ग यामुळे हा किल्ला शोभिवंत दिसतो. या किल्ल्याचा भक्कमपणा, त्याची उंची, अवघड जागा आणि अजिंक्यतारा पाहून युरोपियन लोक त्यास `पूर्वेकडील जिब्रॉल्टर' म्हणतात.किल्ल्यावर आजही गंगासागर तलाव, बालेकिल्ला, नगारखाना, राज दरबार, रंगमहाल, जगदीश्वर मंदिर या वास्तू आपल्याला पहायला मिळतात. महाराजांचे समाधीस्थळ ही तर रायगडावरील एक पवित्र निशाणी होय.
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.
मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण कि.मी. अंतरावर असलेल्या खडकाळ बेटावर हा किल्ला बांधण्यात आला आहे.
इ.स. १६६५ मध्ये हा किल्ला शिवाजी महारांजी स्वत:च्या देखरेखीखाली बांधला. या बांधकामासाठी त्यांनी १०० पोर्तुगीज तज्ज्ञांचे सहाय्य घेतले होते. असं म्हणतात की, सुमारे ४८ एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या या जलदुर्गासाठी शेकडो कारागीर व कष्टकरी तीन वर्षे अहोरात्र झटत होते.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सभोवती सुमारे ९ मीटर उंच, ३.६ मीटर रूंद व सुमारे २ मैल परिघाचा कोट बांधण्यात आला आहे. किल्ल्यावर अनेक टेहळणी बुरूज असून तटाला लागून पन्नासहून अधिक विस्तृत बुरूज आहेत. शत्रुपक्षावर तोफांचा भडीमार करण्यासाठी या बुरूजांचा उपयोग केला जात असे. आजही या बुरूजांवर जुन्या तोफा पहायला मिळतात. पुढे इ. स. १८१२ मध्ये हा अजिंक्य किल्ला ब्रिटिशांनी हस्तगत केला.
किल्ल्यात शिवाजी महाराजांची वीरासनात बसलेली मूर्ती असलेले मंदिर असून आजही त्या मूर्तीची लोक पूजा करतात. हे मंदिर शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांनी बांधले.
सज्जनगड
तुळजापूर

पावनखिंड

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी म्हणजे १७११ फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या दोन डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून सात मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदी उगम पावली आहे. पन्हाळा, म्हाळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, घोडखिंड असा हा मार्ग आहे.शिवरायांचे विश्वासू सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांनी मावळयांच्या मदतीने सिद्दी मसूदच्या सैन्याला या खिंडीतच थोपवून धरले आणि राजांना विशाळगडी जाण्याची संधी मिळाली. पावनखिंडीतील संग्रामाचे मूळ कारण पन्हाळगड ! सिद्दी जौहरने पन्हाळयाला करकचून वेढा घातलेला. महाराज किल्ल्यावर अडकलेले. अखेर एक योजना आखून राजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले. सिद्दीची छावणी आनंदात मशगूल झाली आणि वेढा ढिला पडला.
इकडे शिवराजांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले आणि बरोबर ६०० हत्यारबंद पायदळ, बाजीप्रभूंसह महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळयावरून निसटले. १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा, गुरूवार, रात्रीचे सुमारे १० ची वेळ. विजा चमकत होत्या पाऊस कोसळत होता आणि एवढ्यात सिद्दीच्या एका पहारेकऱ्याने हे पाहिले आणि तो ओरडला, `दगा दगा!' ही चाहूल लागताच राजांनी दोन पालख्या केल्या. एका पालखीत ते स्वत: तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी (शिवा काशीद) बसला. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोहोचविली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवराजासाठी शिवा काशीदने समर्पण केले.इकडे मसूद एक हजार पायदळासह घोडखिंडीच्या दिशेने दौडत होता. १३ जुलैची ती पहाट! राजे आणि बाजी खिंडीशी आले आणि मसूदच्या सैन्याची आरोळी ऐकू आली. प्रसंग मोठा बाका. बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितले, विशाळगडी जावे, गनीम अफाट आहे, गनीम दावा साधील, मी इथे खिंड रोखून धरतो. एकालाही खिंड चढून देत नाही. मात्र गडावर पोहचल्याची खूण म्हणून तोफांचे आवाज द्या.
बाजींनी गनिमीकावा साधला. आपली मोजकी माणसे झाडांवर बसवून मसूदचे हशम येताच त्यांच्यावर दगडांचा मारा सुरू केला. नारळ फुटावा तशी हशमांची डोकी फुटू लागली. खिंडीच्या तोंडाशी अडसरासारखे राहून बाजींनी दिवसभर त्वेषाने खिंड लढविली. अनेक घाव बसले, देह घायाळ झाला, मावळे मरून पडले. बाजींचे लक्ष होते विशाळगडाकडे ! अखेर सायंकाळी सहा वाजता तोफांचे आवाज आले. याचवेळी बाजींच्या वर्मी घाव बसला आणि ते कोसळले. शेवटच्या क्षणी ते म्हणाले, `महाराज माझे काम मी केले, येतो.'
विशाळगडावर महाराज वाट पहात होते, जिवंत बाजीची. पण महत्प्रयासाने मावळयांनी बाजींचे प्रेत गडावर नेले. महाराज अत्यंत कष्टी झाले. रायाजी नाईक, बादल यांनी राजांच्या आज्ञेने बाजींच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले. ती समाधी दुर्लक्षित आहे. आजही या खिंडीत पोहोचताच १३ जुलै १९६० च्या रणसंग्रामाची आठवण होते. खिंडीचाही गळा दाटून येतो. रक्ताचा सडा शिंपून स्वामीनिष्ठेपायी, स्वराज्यासाठी बाजीने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी, पुरोगामी व इतिहासभिमानी म्हणवणाऱ्या शासनाने त्यांच्या समाधीची देखरेख ठेवली तरच आपला इतिहासभिमान सार्थ ठरणार आहे.
अक्कलकोट

सोलापूरपासून ४० कि. मी. अंतरावर हे स्थान असून श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.अक्कलकोट हे पूर्वी संस्थान होते व ते राजधानीचे नगर होते. येथील राजे मालोजीराजे भोसले श्री स्वामी समर्थांचे अनन्य भक्त होते. अक्कलकोटच्या परिसरात श्री स्वामी समर्थांनी अनंत चमत्कार केले. विदेही अवस्था व संपूर्णतया मुक्त संचार यामुळे श्री स्वामी समर्थांच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारची गूढता असे. असे असूनही हजारो भक्त त्यांच्या दर्शनार्थ अक्कलकोटला गर्दी करीत असत.अक्कलकोटला येण्यांपूर्वी श्री स्वामी समर्थांनी अनेक ठिकाणी भ्रमंती केलेली असल्यामुळे त्यांचा जन्म आणि पूर्वायुष्याबद्दल अनेक तर्क आहेत.
इ.स. १८७८ मध्ये त्यांनी अक्कलकोट येथेच समाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय ५०० वर्षाहूनही अधिक होते असं मानलं जातं.नंतरच्या काळात सिद्धपुरूष म्हणून परिचित असलेले श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्यामुळेही अक्कलकोट हे भाविकांचं श्रद्धास्थान झालं आहे. अलिकडेच श्रीगजानन महाराजांनी समाधी घेतली. अक्कलकोट हे या दोन तपस्वी पुरूषांच्या वास्तव्याने पुनीत झालेले शहर आहे.
आळंदी

अंबेजोगाई
गिरीजात्मक

पुणे-जुन्नर मार्गावर जुन्नरपासून अवघ्या ५-६ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या परिसरात हे स्थान डोंगरावर आहे. हा डोंगर लेण्याद्री डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बौद्धकालीन गुंफा असून या गुंफातच हा गणपती आहे.
मूर्तीच्या दोन्ही बाजूस हनुमान, शंकर अशा काही देवांच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी गुंफा असल्याने मंदिराच्या उजव्या बाजूला डोंगरात कोरून काढलेल्या काही ओवऱ्या आहेत. कुकडी नदी ओलांडल्यानंतर मंदिर डोंगरात असल्याने जवळपास २८३ पायऱ्या
बल्लाळेश्वर

मंदिराची बांधणी रेखीव असून ते पूर्वाभिमुख आहे. या देवस्थानाच्या मागेच एक स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. व तेथील गणपती धुंडीविनायक म्हणून ओळखला जातो. कल्याण श्रेष्ठींचा मुलगा बल्लाळ याच्या उपासनेतूनच प्रगट झालेला हा गणपती म्हणून त्यास बल्लाळेश्वर असे नाव पडले.
महागणपती
मंदिर पूर्वाभिमुख असून त्यास इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे. गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदि सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे सहाय्य दिले आहे.
चिंतामणी
थेऊर येथील गणेशमूर्ती स्वयंभू व उजव्या सोंडेची आहे. मंदिराचे महाद्वार उत्तरभिमुख आहे पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभामंडपही मोठा आहे. देवळाच्या तिन्ही बाजूंना मुळा व मुठा या दोन नद्यांचा वेढा आहे.
पुणे नजिकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी या तपस्वी पुरूषाने या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली होती, असा ऐतिहासिक दाखला असून थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामणी देव यांनी बांधले आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांना या गणेशस्थानाबद्दल अखेरपावेतो प्रेम वाटत होते. त्यांचा मृत्यूही या मंदिराच्या आसमंतातच झाला.
बाहुबली

जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील बाहुबली (कुंभोज) हे स्थान शतकापासून प्रसिद्ध आहे . कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्याच्या उत्तरेस सात कि. मी. अंतरावर हे स्थान वसले आंहे.बाहुबलीचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या आळत्याच्या शिलालेखात आसपासच्या डोंगराचे वर्णन आहे. ते वर्णन बाहुबली डोंगराला पूर्णपणे लागू आहे.
त्यावेळी या डोंगराचे नांव बाहुबली डोंगर नव्हते पण डोंगरावरील जिनप्रतिमा, चैत्यालये यांच्या वर्णनावरून तोच असावा असे दिसते. प्राचीन काळापासून बाहुबलीचा डोंगर जैन मुनींची तपस्याभूमी म्हणून ओळखला जात असल्याचे दिसते. आजही या ठिकाणी आठशे वर्षापूर्वीची ६० फूट उंचीची १००८ भगवान बाहुबलींची अतिशय सुंदर, कलापूर्ण मूर्ती व प्राचीन सहस्त्र जिनबिंब आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहेत. ही बाहुबलीची मूर्ती इ.स. ११५६ मध्ये शके १०७८ च्या वैशाख शुध्द दशमीस श्री १०८ श्रृतसागर मुनिराज यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्याचा उल्लेख दिगंबर चैन तीथक्षेत्र डिरेक्टरीमध्ये मिळतो. सुमारे ३०० वर्षापूर्वी नांद्रे येथील बाहुबली मुनींनी येथे केलेली तपश्चर्या, १९२६ मध्ये तेथे झालेला चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराज यांचा चातुर्मास, धर्मप्रेमी श्री कल्लाप्पा निखे यांनी घातलेला रत्नत्रय मंदिराचा पाया व त्यासाठी बांधलेली दुमजली चिरेबंदी भव्य इमारत या सर्व गोष्टीमुळे या भागात या पहाडाला जैन धर्मियांच्या दृष्टीने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
देहू
गणपतीपुळे

रत्नागिरी जिल्ह्यातील हे ठिकाण जसे निर्मळ समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते तेथील स्वयंभू गणपतीसाठी ही भाविक पर्यटकात खूप प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे येथील सागर किनारा खरोखरीच अप्रतिम आहे. सलग १२ कि. मी. लांबीचा हा किनारा स्वच्छ व सुंदर आहे.
येथील वाळू सुद्धा फिकट पांढरी आणि मऊ मुलायम आहे. सकाळच्या कोवळया उन्हात आणि चांदण्या रात्रीच्या चंद्र प्रकाशात तिला वेगळीच लकाकी प्राप्त होते. किनाऱ्यालगत नारळांच्या तसेच फुला-फळांच्या बागा असल्याने समुद्र किनारा सदैव उल्हसित वाटतो. गणपतीपुळे येथील चारशे वर्षीपूर्वीचे गणपतीचे पुरातन देवालय सागर किनाऱ्यालगत असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आहे. हा गणपती स्वयंभू असून भाविक लोक संपूर्ण टेकडीलाच गणेश स्वरूप मानून या टेकडीला प्रदक्षिणा घालतात.
जेजुरी
ज्योतिबा

वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबादेवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिध्द आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भोतिक व ऐहिक ऎश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि. मी. वर आहे.
सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे. त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच ज्योतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेले हे ज्योतिबाबाचे पुरातन मंदिर आहे. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा !
महालक्ष्मी

कोल्हापूरात सर्वोच्च स्थान या मातेला, महालक्ष्मीला व देवालयाला आहे. श्री महालक्ष्मीची आशीर्वादानेच श्री. शाहू छत्रपती व श्री राजाराम महाराजांच्यासारखे सुपुत्र जन्माला येऊन या शहराची वाढ व विकासाकरिता त्यांनी प्रयत्न केले. आजच्या शहराच्या सद्यस्थितीचा पाया श्री महालक्ष्मीच्या देवालयाने घातला. त्याच्या वाढीस महाराजांचे प्रयत्न कारणीभूत झाले. श्री महालक्ष्मीचे देवालय शहराच्या मध्यवस्तीत, जुन्या राजवाड्यानजीक आहे.
भव्य व सुंदर हेमाडपंथी पद्धतीचे हे देवालय म्हणजे प्राचीन शिल्प कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या देवालयाचा आकार ताऱ्यासारखा असून ते दोन मजली आहे. देवालयात श्री महालक्ष्मीखेरीज दक्षिणेला महासरस्वती, उत्तरेला महाकाली वरच्या मजल्यावर गणपतीच्या मूर्ती आहेत. या देवालयाला असंख्य खांब असून ते मोजता येत नाही असा भाविकांचा समज आहे. मुख्य देवालयासमोर एक प्रवेश मंडप आहे. याला गरूड मंडप असे म्हणतात. नवरात्रात येथे उत्सव साजरा केला जातो. इतर वेळी कीर्तन, प्रवचन, भजन, ग्रंथवाचन वा प्रदर्शनासाठी देखील याचा उपयोग केला जातो. महालक्ष्मीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी असलेला मार्ग मंदिराच्या आतल्या बाजूसच असून अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
मुख्य देवालयाच्या सुरवातीलाच प्रवेश करताना मुख्य मंडप लागतो। त्याच्या दोन्ही बाजूला भिंतीवर भरत आणि शत्रुघ्न यांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. पुढे गेल्यावर मणिमंडप लागतो. कलात्मक कोरीव काम आणि जय विजय या द्वारपालांच्या मूर्ती मनमोहक आहेत. मूळ स्थान म्हणजे देवीची स्थापना केलीली जागा; सन १७२२ पर्यंत श्री महालक्ष्मीची मूर्ती मुस्लिम हल्ल्यापासून बचाव करण्याकरिता म्हणून सुमारे दोनशे वर्षे झाकून ठेवण्यात आली होती.
श्री महालक्ष्मी देवालयात येण्यासाठी चार प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी मुख्य प्रवेशद्वार महाद्वार पश्चिमेला असून त्याच्यावर नगारखाना आहे. देवालयाच्या उत्तरेला काशी व मणिकर्णिका ही दोन तीर्थे आहेत. आवारात बाजूला दीपमाळांचा छोटा समूह असून दोन आधुनिक प्रकारची पाण्याची कारंजी आहेत. उत्तरेकडील प्रवेश द्वारावर एक मोठी घंटा वाजविली जाते. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या व मोठ्या घंटांमध्ये या घंटेचा समावेश होतो. या घंटेचा निनाद चार पाच मैलाच्या परिसरात घुमतो. दर पौष महिन्यामध्ये सायंसूर्यकिरणोत्सव साजरा केला जातो. या तीन दिवसाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी ठराविक वेळ सूर्यकिरण हे मंदिरात शिरुन श्री महालक्ष्मीचे मुखावर पडतात व काही वेळातच नाहीसे होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य देवालय व त्या समोरील गरुड मंडप दोन्ही मिळून महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुमारे १५० फूट आच्छादित बांधकाम आहे. मंदिरा सभोवती व पश्चिमेला अनेक घरे आहेत. या तीन दिवसाखेरीज वर्षात केव्हाही देवीच्या मुखावर सूर्यकिरणे पडत नाहीत.
नृसिंहवाडी

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. नृसिंहवाडी म्हणजे दत्तसंप्रदायची राजधानीच. कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावर कृष्णा आणि पंचगंगेच्या पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे.
श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून, त्यांच्या स्वयंभू पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते. श्री दत्तगुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व त्यांनीच हा परिसर सुफल करून सोडला.
नृसिंहवाडीचे क्षेत्र कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरले आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजारापर्यंत आहे. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम असे मंदिर आहे. मंदिरातच स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
सांप्रत उभे असलेले मंदिर विजापूरला अदिलशहा या मुसलमान बादशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून बादशहा नृसिंहवाडीस आला. त्याने श्री गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते. सध्या उभे असलेले श्री गुरुमंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही, तर लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट व कृष्णा नदी संथ वाहत आहे.मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यात पादुकांचे पूजन करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी येथे आसनस्थ होऊन पूर्जा-अर्चा करतात, त्यांच्या एका बाजूला श्रीगणेशाची भव्य मूर्ती स्थापिली असून तिचीही पूजा होते.
या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंनी उंच व विस्तृत खांब आहेत.
पंढरपूर

शनि-शिंगणापूर

शेगाव
समाधी मंदिराशिवाय श्री गजानन महाराजांच्या जिवितकार्याशी निगडित अनेक दर्शनीय स्थाने शेगावच्या परिसरात आहेत.
शिर्डी

शिर्डीला भक्तांची रोजच हजारोंच्या संख्येने गर्दी लोटते. शिर्डी इतकी लोकप्रियता इतर अन्य कोणत्याही स्थानाला क्वचितच असावी. गुरूवारच्या दिवशी तसेच रामनवमी व गुरू पौर्णिमा या दिवशी शिर्डीला भक्तमंडळीची दूरदूरहून गर्दी लोटते
महाबळेश्वर

पेच प्रकल्प-पं. नेहरू नॅशनल पार्क
पेच अभायरण्याचा विस्तार प्रचंड असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांची संख्याही मोठी असून त्यांच्या संचारक्षेत्राची व्याप्तीही मोठी आहे. या अभयारण्यातील तोतला डोह, राणी डोह, सिल्लारी याठिकाणी वनखात्याचे विश्रामधाम आहेत. प्रवासाठी पक्के रस्ते आहेत. अभयारण्यातील प्रदेश पहाडी आहे. सातपुडा पर्वताचे डोंगर या अभयारण्यात येतात. नयनरम्य निसर्ग, विपुल वृक्षसंपदा मुबलक वन्यप्राणी व पर्यटकांना फेरफटका मारण्यासाठी उत्तम रस्ते हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. वाघ, बिबटे, गवे, सांबर, चितळ आदि वन्य प्राण्यांचे सहज दर्शन या ठिकाणी जागोजाग असलेल्या पाणवठ्यांच्या काठी होते.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून सुमारे ६० कि. मी. अंतरावर या अभयारण्याची हद्द सुरू होते.
सागरेश्वर
सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ५-६ चौ. कि. मी. इतकाच असला तरी हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटते. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे.सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.
ताडोबा

या अभयारण्याच्या मधोमध अतिशय सुंदर भव्य तलाव आहे. या तलावाभोवती लहानमोठ्या टेकड्या असून त्यावर घनदाट जंगल आहे. गवा आणि मगर हे या अभयारण्याचे मुख्य आकर्षण आहे. उन्हाळयाच्या दिवसात मध्यवर्ती तलावाभोवती रान गव्यांचे कळप जमा झालेले दिसतात. त्याखेरीज वाघ, बिबटे, चितळ, सांबर, कोल्हे, अस्वल, रानडुक्करं आदि वन्यप्राणीही या जंगलात आढळतात. माकडं, रानमांजरं, नीलगाय आदि प्राणीही येथे मुक्तपणे संचार करतात.वन्यप्राणी जवळून पाहता यावेत म्हणून अभयारण्यात जागोजाग उंच मचाण बांधण्यात आले आहेत. विविध जातीचे पक्षी आणि वृक्षांची येथे रेलचेल आहे.
वेरूळ
या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसच होय. `आधी कळस, मग माया' ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे.
भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारं इतकं अप्रतिम आणि जिवंत आहे की ही लेणी पाहताना माणूस हतबद्ध होतो. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. हे लेणं इतकं विस्तृत आहे की ते पाहतानाच वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.
दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य, विहार आणि स्तूप असून स्तुपात बैठी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा जैन पंथियांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे. एम. टी. डी. सी. नेहमी मार्च महिन्याच्या सुमारास येथे एलोरा समारोह आयोजित करते. त्यात देशातील प्रसिद्ध कलावंतांचे संगीत-नृत्याच्या मैफिली आयोजल्या जातात. पर्यटकांच्या दृष्टीने हा एक आनंदमेळाच असतो.
पावस

सोहम साधनेचा पुरस्कार करून लोकोद्धार करणारे स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून अवघ्या २० कि. मी. अंतरावर आहे. या ठिकाणी स्वामीजींचे समाधी मंदिर आहे. स्वामी स्वरूपानंदांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार भक्तांपर्यन्त सुबोधणे पोहचविला. त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या हिताबद्दलची तळमळ आणि साधेपणा यामुळे त्यांचा भक्त परिवार फार मोठा आहे. त्यांच्या भक्तमंडळींनी `स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ' हा ट्र्स्ट स्थापन करून स्वामीजींच्या विचार व कार्याचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले आहे.
पावस येथे येणाऱ्या भक्तांसाठी मंडळातर्फे अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. श्री स्वामी मंदिर, उत्सव मंडप, भक्त निवास, आध्यात्मिक मंदिर आदि प्रकल्प या मंडळाने प्रत्यक्षात आणले आहेत. स्वामीजींनी लिहिलेल्या ग्रंथांचं प्रकाशनही मंडळातर्फे केले जाते. ज्या निवासात स्वामीजींनी सतत चाळीस वर्षे वास्तव्य केले ते अनंत निवास भक्त मंडळाने श्रद्धापूर्वक जतन करून ठेवलेले आहे. मंडळातर्फे ग्रंथ पारायण, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत तसेच भक्तांना भोजन व प्रसाद असे उपक्रम राबविले जातात. मंदिराच्या आवारात एका आवळीच्या झाडातून एक स्वयंभू गणपतीही प्रकट झाला आहे. येथे विश्वेश्वर व सोमेश्वर मंदिरे आहेत.
रम्य समुद्रकिनारे आणि अपूर्व खाद्ययात्रा- रत्नागिरी

लालमाती, गडदुर्ग, सागराची गाज, मासेही- सिंधुदुर्ग
